चिताभस्म भाग 8
#चिताभस्म भाग 8 पूर्वार्ध त्या व्यक्तीला नमस्कार करून अर्जुनच्या वडिलांनी सगळ्यांना वाड्याच्या आत मध्ये घेतलं. एव्हाना बाकी सगळ्यांना जाग आली होती. मुलं आता काहीशी सावरली होती. पण सगळ्या मोठ्यांच्या मनात एकच प्रश्न होता....हे नेमके हरवले कोठे होते? कारण टेकडीच्या दुसऱ्या बाजूला ओसाड माळरान होतं. एकही गाव नव्हतं..... मग हा माणूस नेमका होता तरी कोण? आता पुढे... काही वेळाने सावरल्यानंतर अर्जुनच्या वडिलांनी चहापाणी झाल्यावर सगळ्यांवरून नजर फिरवली. आणि मग त्या व्यक्तीकडे पहात ते म्हणाले, " भाऊ तुमचे खूप खूप आभार तुम्ही आमच्या लेकरांना आमच्यापर्यंत सुखरूपपणे आणलत. पोरं जेव्हापासून हरवली होती आम्हाला कुणाला तर काहीच समजत नव्हतं. सगळं काही वरच्याच्या भरवशावर सोडून दिलं होतं आम्ही. पण तुम्ही त्याच्या रूपातच आलात आणि आम्हाला आमची पिल्लं पुन्हा दिसली. " " आभार कसले मानताय. ते माझं कर्तव्यच होतं. म्हणजे तुम्ही त्याच्या भरवशावर सोडून दिलं होतं ना? मग त्याच्या वतीने कुणीतरी त्याचं काम पूर्ण करणं सुद्धा गरजेचं होतं. होय की नाही? ते काम माझ्या वाट्याला आलं इतकच." तो माणूस ...